चंद्रकांत ठाकरे - लेख सूची

इंडियन ॠतू

अनाहूत आलेल्या वादळाने उडवून नेलीत काही पत्रे, तुटून पडले काही पंख..! सोबतीने आलेला मित्र शांत थोडीच राहणार…! जीव तोडून बँकेचे हप्ते भरले जात होते.. समतल केलेल्या जमिनीला बांधलेले बांध मात्र साथ सोडून पळाले अन् वावरेच धो – धो वाहू लागली! तुटलेल्या छपराला चिकटलेले आहेत फक्त काही कोरडे अश्रू! एक बैल डोंगर पायथ्याशी मरून पडलाय.. एकमेव …

कविता – कालची व आजची

कविता आजची असो अथवा कालची, तिच्या निर्मितीमागील प्रेरणा मानव्य असते. तिला स्थलकालाचे बंधन नसते. साहित्य निर्मितीमागील प्रेरणा ही सर्वसामान्यपणे प्रत्येक देशात व भाषेत सारखीच असते. साहित्याची निर्मिती होण्यासाठी एक फार मोठी शक्ती आवश्यक असते. ती म्हणजे “प्रतिभा”! वामनाने यालाच ‘कवित्वाचे बीज’ असे म्हटले आहे. त्यासोबतच स्फूर्ती व कल्पनाशक्तीही महत्त्वाची असते. प्लेटो व अरिस्टॉटलने कलात्मक अनुकरणाचा …

तुकडपट्टी

मला भीती वाटते….माझे डोळे पुसणार्‍यांचीतसाच अंग चोरून उभा असतो!अंग शहारतं….डोळे पुसणार्‍याच्या डोळ्यातील फायदा उचलणार्‍या क्रूर कपटी हालचालींमुळे! माहिती असतं..या अश्रूंची किंमत आता भलताच कुणीतरी उचलेलआणि विरून जातील या वेदनातुकडपट्टी झालेल्या शेताच्या मातीत! अजून एक तुकडा..आणि शेवटचा श्वासएवढंच शिल्लक आहे शेतीचंआणि शेतातच माती होणार्‍या जीवाचं अस्तित्व! उरणार आहेत फक्त फुशारक्या-पूर्वजांकडे असलेल्या शेकडो एकर शेताच्याआणि वांझोट्या रुबाबाच्या …